। अलिबाग । वर्षा मेहता ।
रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाचे मोठे योगदान आहे. शेकाप हा लढाऊ वृत्तीचा पक्ष आहे. शेतकरी, कष्टकरी, कामगारांवर होणारा अन्याय आजपर्यंत शेकापने सहन केलेला नाही. जनतेवर अन्याय होत असेल तर त्याविरोधात आवाज उठविण्याचे काम शेकाप करीत असल्याचे स्पष्ट मत काँग्रेसचे माजी आ. डी.एन. चौलकर यांनी व्यक्त केले. ङ्गकृषीवलफला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते.
रायगड जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्ष का नाही वाढला यावर उत्तर देतांना ते म्हणाले कि, ङ्गअंतुलेंच्या काळामध्ये जी मंडळी होती ती आता काळाच्या आड गेली आहे. जे नवीन लोक आहेत त्यांना मार्गदर्शन करणारे कोणी नव्हते. काँग्रेस काय आहे ते समजावले पाहिजे. शिबीरे घेतली पाहिजेत, काँग्रेसची आख्यायिका, 136 वर्षांचा पक्षाचा इतिहास वाचून दाखवला पाहिजे. मात्र ते कोणी केलं नाही तसा नेता निर्माणच झाला नाही. आता माणिकराव जगताप हे चांगले कार्यकर्ते होते; पण त्यांनी फक्त त्यांच्या विभागामध्येच काम केलं. मधुकर ठाकूर यांनीदेखील त्याच्या विभागात काम केलं. सर्व जिल्हा फिरणारा नेताच कॉग्रेसला मिळाला नाही
सध्या राजकारण नाही तर अर्थकारण सुरु आहे. पैशांच्या जोरावर कोणालाही विकत घेता येते. ज्या पक्षाकडे पैसा आहे, तोच सर्वश्रेष्ठ ठरत आहे. पक्षनिष्ठता राहिली नाही. आत्ताच्या परिस्थितीत देशात हम करे सो कायदा असं झालं असल्याचेही त्यांनी मान्य केलं.
सध्या देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोनलनावर भाष्य करतांना ते म्हणाले, ङ्गआपला देश कृषी प्रधान देश आहे. शेतकर्याला मजबुत करणे आपले काम आहे. त्यांच्या मागण्या सामान्य आहेत. पण दडपशाही होत आहे. त्यामध्ये किती लोकांचे बळी गेेेले आहेत. जालियवाला बागेतली दडपशाही त्याठिकाणी केली जात आहे.
रायगड जिल्ह्यातील महाविकास आघाडी संदर्भात बोलतांना ते म्हणाले , ङ्गहे लोक एक दिवशी सांगतात आम्ही एक आहोत तर दुसर्या दिवशी एक घाव दोन तुकडे करणारी वक्तव्य करतात. गिते फक्त शिवसेनेच्या नावावर निवडून आले आहेत. त्यांचा प्रभाव ठराविक ठिकाणीच आहे.
काय केलं पाहिजे?
रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत हे गावोगावी फिरत आहेत. सध्याच्या परिस्थितीत काँग्रेसने राष्ट्रवादीसोबत जायला पाहिजे. शरद पवारांच्या सोबत राहणे गरजेचे आहे. राष्ट्रवादीचा जिल्ह्यामध्ये प्रभाव आहे. त्यांचे खासदार, आमदार, पालकमंत्री आहेत. काँग्रेसमध्ये जनतेचे प्रश्न समजावून घेणारे कोणीही नाही. त्यामुळे महेंद्र घरत यांनी त्यांच्याशी जमवायला पाहिजे. हे काम जर काँग्रेसने केले तर ते यशस्वी होतील. काँग्रेसने स्वबळाच्या गोष्टी करु नये. त्यांचे बळ अजून तयारच नाही. त्यामुळे सर्वप्रथम स्वबळ निर्माण करा आणि मगच लढा असा सल्लाही त्यांनी दिला.