। माथेरान । वार्ताहर ।
मागील तीन वर्षांपासून माथेरानमध्ये प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे येथील नागरिकांची कोणत्याही प्रकारची कामे पूर्ण केली जात नसून कामगार वर्ग टाळाटाळ करून नागरिकांना वेठीस धरण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. जेथून आवक अधिक आहे अशा मंडळींची कामे करण्यास कर्मचारी वर्ग खूपच उतावीळ असतात. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना त्यांच्या छोट्याशा कामासाठी नाहक फेर्या मारण्यासाठी ही कार्यालयातील मंडळी जाणूनबुजून भाग पाडत असल्याची तक्रार येथील नागरिकांमधून होत आहे.
एकंदरीतच या कार्यालयात कामावर असणार्या लोकांवर मुळात प्रमुख अधिकार्यांचाही अंकुश नाही. त्यामुळेच मनाला वाटेल त्याप्रमाणे येथील कारभार सुरू आहे. आठवड्यातील पाच दिवस कामाचे असताना देखील दिवसभरात जेमतेम दोन ते तीन तास कामे करत असल्याचे विदारक चित्र याठिकाणी पहावयास मिळत आहे. त्यामुळे जिल्हाधिकार्यांनी याकडे लक्ष केंद्रित करून माथेरान सारख्या दुर्गम भागातील सर्वसामान्य लोकांना या कार्यालयातुन होणार्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.