• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 5, 2025
in माणगाव, राजकीय, रायगड
0 0
0
सुनील तटकरे गद्दारीचा बादशहा: अरुण चाळके
0
SHARES
286
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादीतील वाद विकोपाला

| माणगाव | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील वाद खा. सुनील तटकरेंनी महाड येथील कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांच्या नॅपकिनबद्दल मिमिक्री करीत चेष्टा केल्याने विकोपाला पोहोचला आहे. शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके यांनी पत्रकार परिषदेत बोलताना रायगड जिल्ह्यातील गद्दारीचा बादशहा सुनील तटकरे असल्याची जोरदार टीका केली आहे.

जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सुनील तटकरेंनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे असे आव्हान दिले. माजी जिल्हा प्रमुख अनिल नवगणे यांनी पाठीमागून वार करायची तटकरेंची गेल्या अनेक वर्षांची परंपरा असून, त्यांचे राजकारण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी व कुटुंबासाठी असल्याचा घणघाती आरोप केला. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे, तालुका प्रमुख ॲड. महेंद्र मानकर, उपतालुका प्रमुख सुधीर पवार, माजी सभापती महेंद्र तेटगुरे, लोणेरेचे माजी सरपंच रवींद्र टेंबे, विभाग प्रमुख मनोज सावंत, प्रताप घोसाळकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना अरुण चाळके म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून जी राजकीय धुसफूस सुरु आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत. सुनील तटकरे हे ज्याप्रमाणे वागताहेत, तसे त्यांचे पाय खोलवर खड्ड्यात जात आहेत. त्यांना शिवसेनेने निवडून आणून नवसंजीवनी देऊन खासदार केले आहे. पण, तटकरेंना याची जाणीव नाही हे त्यांच्यात असणारे अत्यंत वाईट गुण असून, त्यांनी ते सिद्ध करून दाखवले आहे. त्यांची मंत्री भरत गोगावले यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही. तटकरेंनी कर्जत मतदारसंघातून सुधाकर घारेंना उभे करून महायुतीचे आ. महेंद्र थोरवे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. पण, तरीदेखील थोरवे यांनी या मतदारसंघातून बाजी मारली. महाडमध्ये भरतशेठना त्यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, तरीदेखील गरीब जनतेच्या आशीर्वादाने भरतशेठ निवडून आले.

रायगड जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाचा जो तिढा आहे, त्याला तटकरेच कारणीभूत आहेत. रायगडच्या जनतेला आता भरतशेठ पालकमंत्री म्हणून हवे आहेत. तुम्ही कितीही वल्गना करा, तुम्हाला पदावर राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही फक्त तुमचे कुटुंब चालवता. रायगड जिल्हा तुम्हाला आंदण दिले आहे काय? रायगड जिल्ह्यात तुम्ही कोणते विकासाचे प्रकल्प आणलेत? विधानसभा निवडणुकीत आमच्या सर्व शिवसैनिकांनी एक दिलाने काम करून आदितीला निवडून आणले. मुंबई-गोवा महामार्गाचे जे काम रखडले आहे, त्याला तटकरेच जबाबदार आहेत. जाणूनबुजून त्यांनी महामार्गाचे काम रखडून ठेवले आहे. उद्याच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देईल. या निवडणुकात शिवसेना व भाजप मोठे यश संपादन करेल.

यावेळी बोलताना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेत जो कलगीतुरा चालला आहे, त्याला तटकरेच कारणीभूत आहेत. तटकरे यांनी भरत गोगावले यांची नक्कल केली नसती तर हा विकोप वाढला नसता. सुनील तटकरे जे बोलतात विकास केला, त्यांनी काय विकास केला? गेली 17 वर्षे मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. हे काम त्यांना दोन वेळा खासदार, आमदार, मंत्री होऊनही मार्गी लावता आलेले नाही. तटकरेंनी केवळ ठेकेदार नेमले ते फक्त ठेके मिळवण्यासाठी. बॅरिस्टर अंतुले हे खासदार असताना त्यांनी आरसीएफ, आंबेतचा पूल, लोणेरे विद्यापीठ असे अनेक मोठमोठे प्रकल्प आणून जिल्ह्याचा विकास केला.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना माजी उपजिल्हा प्रमुख अनिल नवगणे म्हणाले की, गेल्या चार-पाच दिवसांपासून तटकरे भरतशेठवर टीकाटिप्पणी करून त्यांची चेष्टा करीत आहेत. अखंड महाराष्ट्रात मंत्री भरतशेठ हे चांगले काम करीत असून, त्यांच्यावर टीकाटिप्पणी कोणी करीत असेल तर यापुढे ते खपवून घेतले जाणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी फक्त घरातल्या व्यक्तींकडेच महत्त्वाची पदे असावीत, दुसऱ्याला कधी मोठे होऊ द्यायचे नाही, असे त्यांचे राजकारण असल्याची जोरदार टीका नवगणे यांनी केली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

अलिबागच्या प्रवेशद्वारावरच खड्ड्यांचे साम्राज्य

Next Post

शेतकऱ्यांची फाशी तूर्तास स्थगित

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

वरळी येथील समुद्रात बुडून दोघांचा मृत्यू
sliderhome

उल्हास नदी पात्रात बुडून पर्यटकाचा मृत्यू

July 15, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी
sliderhome

NMIA News: नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानाची ऐतिहासिक भरारी

July 15, 2026
लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था
महाड

लाडवली-मांडले रस्त्याची दुरवस्था

July 15, 2026
Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र
sliderhome

Ladki Bahin Yojana: रायगडात 50 हजार बहिणी अपात्र

July 14, 2026
नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र
अलिबाग

नागावच्या सुरक्षित पर्यटनासाठी ग्रामपंचायत अन्‌‍ पोलीस एकत्र

July 14, 2026
कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला
sliderhome

कार्यालयाची वेळ धाब्यावर; कर्मचाऱ्यांच्या विलंबाचा फटका जनतेला

July 14, 2026
Next Post
शेतकऱ्यांची फाशी तूर्तास स्थगित

शेतकऱ्यांची फाशी तूर्तास स्थगित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?